विषाची बाटली कुठून आली... ??
विषाची बाटली कुठून आली... ?? ------------------------------------------- कुठल्याही समाजाची ऐकी ही प्रस्थापित किंवा मुठभर सवर्णांच्या सत्तेसाठी धोक्याची घंटा असते...!! आक्रमक वृत्तीचा, लढाऊ बाण्याचा, आणि सत्ताधारी मानसिकतेचा समाज एकत्र येतं असेल तर मूठभर सवर्ण आणि प्रस्थापित घराणे यांच्या पोटात गोळा उठतो....!! प्रस्थापितांना आपली सत्ता धोक्यात येते का? म्हणून भिती वाटतेय. आणि म्हणून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या समाजात बेकी कशी निर्माण करायची म्हणून प्रस्थापित सत्ताधारी कोणत्याही स्तराला जाऊन एकत्र आलेल्या समाजात विष पेरणी करुन बेकी निर्माण करतात...!! देशाचा इतिहास साक्षी आहे, इथं जाती कशासाठी निर्माण केल्या. जाती जातीत अंतर्विरोध कसा उत्पन्न झाला. हा भेदनीतीचा सामाजिक इतिहास ओरडून, ओरडून सांगतोय की, मुठभर सवर्णांनी सर्व सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी चालविलेला हा खटाटोप आहे...!! गेल्या एक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्र पायदळी तुडवत जाहीर सभा